
सोमय्या ग्रुप द्वारा गुढीपाडवा थाटात साजरा
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या ग्रुप द्वारा गुडी पाडवा (नवीन वर्षाचे) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.एस आंबटकर, संस्थचे उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर,डायरेक्टर सौ.अंकिता पी.आंबटकर , प्राचार्य श्री. जमीर शेख, उपप्राचार्य श्री.दीपक मस्के , प्रा.राजकुमार, प्रा.अमित जोगी रजिस्ट्रार श्री.बिसन सर , उपस्थित होते, सर्वप्रथम दीपप्रज्वलन करून गुडी उभारण्यात आले.
प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष श्री.पी.एस.आंबटकर यांनी करीत कार्यक्रम सुरुवात करण्यात आले.चॅत्रातील पहिला दिवस गुढ्या तोरणे उभारून साजरा करण्याची परंपरा जपताना नवनवीन प्रवाह मिसळताना दिसत आहेत . गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे. महाराष्ट्राच्या नववर्षाची सुरूवात गुढीपाडव्यापासून होते. हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो.तसेच महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी जमिनीत रोवली आणि नवीन वर्षाच्या सुरूवाताला तिची पुजा केली. या परंपरेचा आदर राखण्यासाठी गुढी पुजन केले जाऊ लागले. इतिहासात या दिवशी ब्रम्हदेवाने विश्व निर्मिती केली असं वेदात म्हटल्याचा उल्लेख आहे. पौराणिक कथेनुसार श्रीराम वनवासातून पुन्हा अयोध्येला परत आले म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. म्हणूनच यशाची गुढी उभारून हा दिवस साजरा केला जातो. गुढीपाडवा का साजरा करतात यामागे अनेक कथा सांगितल्या जातात, तसेच गुगरांचा प्रसाद देण्यात आला .
या कार्यक्रमाला सर्व विभागप्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्तीत होते .