सोमय्या पाॅलिटेक्नीक मध्ये स्वामी विवेकानंद जयंती साजरी

0 0
Read Time:4 Minute, 54 Second

 

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर, व्दारा संचालित सोमय्या पाॅलिटेक्नीक वडगांव, चंद्रपूर येथे स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली,या कार्यक्रमाकरीता प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष श्री. पी. एस.आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, प्राचार्य श्री. जमीर शेख ,रजिस्टार श्री. बिसेन सर, उपस्थीत होते.कार्यक्रमाची सुरूवात सर्वप्रथम दिपप्रज्वलन करून स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमांची सुरूवात करण्यात आली.

स्वामी विवेकानंद यांची जयंती 12 जानेवारी रोजी साजरी केली जाते,तसेच या दिवसाला ”राष्ट्रीय युवा दिन “ म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंदबद्दल माहिती देत असतांना स्वामी विवेकानंद त्याचे खरे नांव नरंेद्रनाथ दत्त होते, ते मुळचे बंगालचे रहिवासी होते.ते अतिशय साधे जीवन जगत होते, भारतातील थोर पुरूष आणि महान विचारवंत तसेंच आपल्या सर्वासाठी प्रेरणादायक आहेत.स्वामी विवेकानंद हे साहित्य, तत्वज्ञान आणि इतिहासाचे प्रकाण्ड विद्वान होते.स्वामी विवेकानंदानी ”योग“, राजयोग,आणि ”ज्ञान योग“,असे ग्रंथ तयार करून तरूण जगाला एक नवीन मार्ग दिला आहे. ते अशा विचारसरणीचे व्यक्तिमत्व होते,ज्यांनी आध्यात्मिक,धार्मिक जनाच्या बळावर आपल्या दृष्टीद्वारे सर्व मानवी जीवन जगण्याची पध्दती शिकवली,ते नेहमी कर्मावर विश्वास ठेवणारे महान पुरूष होते,स्वामी विवेकानंद,ध्येय साध्य होईपर्यंत आपले ध्येय साध्य करण्यसाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे स्वामी विवेकानंदाचे मत होते.

स्वामी विवेकानंदाच्या अनमोल विचारांनी त्यांनी एक महान मणुष्य बनविले,त्याचे आध्यात्मिक,ज्ञान धर्म,ऊर्जा,समाज,संस्कृती,देशप्रेम,परोपकार,पुण्य,स्वाभिमानाचे समन्वय खूप मजबूत होते. अशा गुणाचे धनी असलेले आपणास पाहायला मिळणार नाही.
नरंेद्र नाथ हे जगभरातील ध्यान,अध्यात्म,राष्ट्रवाद हिंदूत्व आणि संस्कृतीचे वाहक बनले,आणि स्वामी विवेकानंदाच्या नावाने प्रसिध्द झाले. स्वामी विवेकानंद यांना वाचण्याचा खूप रसा होता, त्यांनी वेद,उपनिषद, रामायण,गीता आणि हिंदू धर्मग्रंथ मोठया उत्साहाने वाचले, म्हणून त्यांना ग्रंथ आणि शास्त्रांचे पूर्ण ज्ञान होते.
स्वामीजीनी कोलकत्ता महाविद्यालयातून बी.ए. आणि कायदयाची पदवी मिळवली होती.भारतीय तत्वज्ञानाचा जगभर प्रसार करणारे तत्वज्ञ रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य,गुरूची स्मृती चिरंतन राहावी यासाठी त्यांनी ‘रामकृष्ण मिशन,ची स्थापना केली,”उठा जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्हाला तुमचे ध्येय मिळत नाही“ हा संदेश स्वामी विवेकानंद यांनी तरूणांला दिला,स्वामी विवेकानंद म्हणजे योध्दा,सन्याशी आणि तरूण पिढीचे अखंड प्रेरणास्त्रोत,ज्यांनी फक्त भारतातल्या युवा पिढी समोरच आदर्श नसून जगातल्या संपूर्ण युवा पिढीसामोर आदर्श ठेवला आहे.,असे अनेक उदाहरण देत प्रमुख व्यक्तीनी आपले मत व्यक्त केले.

या प्रसंगी संस्थेतील सर्व विभाग प्रमुख शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %
Previous post सोमय्या पाॅलिटेक्नीक मध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी
Next post सोमय्या पाॅलिटेक्नीक येथे गुरू गोविंद सिंग जयंती साजरी

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News