राज्यात जुलै महिन्यात आतापर्यंत 12 लाख 54 हजार 910 क्विंटल अन्न-धान्याचे वाटप

0 0
Read Time:4 Minute, 23 Second

    मुंबई, दि. 14 जुलै :  राज्यातील  52 हजार 433 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे. 1 जुलै ते 13 जुलै पर्यंत राज्यातील 70 लाख 68 हजार 597 शिधापत्रिकाधारकांना 12 लाख 54 हजार 910 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले  असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

            राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थींची संख्या सुमारे 7 कोटी आहे.  या लाभार्थींना 52 हजार 433 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. राज्यात या योजनेमधून सुमारे 7 लाख 8 हजार 489 क्विंटल गहू, 5 लाख 46 हजार 416 क्विंटल तांदूळ, तर 7 हजार 156 क्विंटल साखरेचे  वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेल्या परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात  अडकलेल्या सुमारे 1 लाख 55 हजार 886 शिधापत्रिकाधारकांनी  ते जेथे राहत आहेत, त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.

      प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्रती लाभार्थी प्रती महिने 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. दि. 6 जून पासून आतापर्यंत जून महिन्यासाठी एकूण 1 कोटी 39 लाख 40 हजार 24 रेशनकार्डला मोफत तांदूळ वाटप केले आहे. या रेशनकार्ड वरील 6 कोटी 30 लाख 48 हजार 755 लोकसंख्येला 31 लाख 52 हजार 440 क्विंटल तांदुळाचे वाटप झाले आहे.

       राज्य शासनाने कोविड-19 संकटावरील  उपाययोजनेसाठी 3 कोटी 8 लाख 44 हजार 076 एपीएल केसरी लाभार्थींना  प्रती व्यक्ती 5 किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू 8 रुपये प्रति किलो व तांदूळ 12 रुपये प्रति किलो) देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे मे व जून महिन्यासाठी आतापर्यंत 13 लाख 4 हजार 46 क्विंटल वाटप केले आहे.

            प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रती रेशनकार्ड 1 किलो मोफत डाळ (तूर किंवा चणा डाळ) देण्याची तरतूद आहे. आतापर्यंत या योजनेतून सुमारे 3 लाख 68 हजार 650 क्विंटल डाळीचे एप्रिल ते जून महिन्यासाठी वाटप केले आहे.

  आत्मनिर्भर भारत या योजनेचा अन्नधान्य लाभ मे व जून या 2 महिन्यांसाठी असून त्याअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिका धारकांना प्रती व्यक्ती 5 किलो मोफत तांदुळ दिला जात आहे.आतापर्यंत 1 लाख 28 हजार 8 क्विंटल मोफत तांदुळ वितरित केला आहे.

            राज्यातील स्वस्त धान्य दुकानांतून सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या अन्नधान्याचे वाटप सुव्यवस्थितरित्या होत असल्याबाबत संनियंत्रण करण्यात येत असून, काळाबाजार करणाऱ्या स्वस्त धान्य  दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %
Previous post 15 जुलै रोजीचा जागतिक युवा कौशल्य दिन ऑनलाइन
Next post चंद्रपूर जिल्हयातील बाधितांची संख्या २०४

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News