
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या ग्रुप मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी करण्यात आली. संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, प्राचार्य श्री.जमीर शेख,उपप्राचार्य प्रा.श्री.दीपक मस्के प्रा. श्री.खुजे, प्रा. श्री.मोजास , प्रा. श्री.जोगे , प्रा. श्री. राजकुमार सर, मंचावर उपस्थित होते. सर्वप्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर आणि प्राचार्य श्री.जमीर शेख यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबद्दल माहिती दिली,डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते. त्यांच पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर होते. ते प्रमुख कार्यकर्ता आणि समाजसुधारक होते. डॉ. भीमराव आंबेडकरनी दलितांच्या उद्धाराकरिता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरिता आपल्या संपूर्ण जीवनाचा त्याग केला. त्यांचा जन्म १४ एप्रिल रोजी झाला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान निर्मिती मागचा उद्देश देशातील जातीपातीच्या भेदभाव आणि अस्पृश्यतेला मुळापासून नष्ट करणे व अस्पृश्यता मुक्त समाजाची निर्मिती करून समाजात क्रांती आणणे हा होता. सोबतच सर्वाना समानतेचा अधिकार देणे हा होता. तसेच त्यांनी भारत संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना धर्माच्या स्वतंत्रतेचा अधिकार दिला, अस्पृश्यतेला मुळापासून नष्ट केले, महिलांना अधिकार मिळवून दिले, समाजातील वेगवेगळ्या वर्गामध्ये पसरलेल्या अंतराला संपवलं.
देशाला सामाजिक, आर्थिक, राजनीतिक, शैक्षणिक, धार्मिक, एतेहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक, ओद्योगिक, संविधानिक, सह वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक काम करून राष्ट्राच्या निर्माणात अमूल्य योगदान दिले.
या कार्यक्रमाला विभाग प्रमुख तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते , सूत्रसंचालन प्रा. डॉ.नितेश चव्हाण यांनी केले. यांनी केले.