कांदा जीवनावश्‍यक वस्तूत टाकणारा महामूर्ख शोधला पाहिजे––– राज्य मंत्री बच्चू कडू

0 0
Read Time:1 Minute, 16 Second

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
केंद्र सरकार जीवनावश्‍यक वस्तूंमधून कांदा वगळणार असल्याची माहिती समजली आहे. त्याबद्दल प्रथम केंद्र सरकारचे अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. पण, कांदा जीवनावश्‍यक वस्तूंमध्ये टाकणारा महामूर्ख कोण आहे, त्याला शोधले पाहिजे, अशी टीका राज्य मंत्री बच्चू कडू यांनी केली.
केंद्र सरकार कांदा जीवनावश्‍यक वस्तूंमधून वगळण्याचा विचार करीत आहे, यावर प्रतिक्रिया देताना राज्य मंत्री कडू बोलत होते. ते म्हणाले की, कांदा खाल्ला नाही, तर लोक मरतात, असा एखादा सुज्ञ मला दाखवा. बच्चू कडू त्याचा गुलाम म्हणून राहील. कांदा निर्यातीला सरकारने अनुदान दिली पाहिजे. कांदा जीवनावश्‍यक वस्तूंमधून काढून त्याला अनुदान दिले पाहिजे, अशी मागणीही राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या वेळी बोलताना केली

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %
Previous post जीवनावश्यक वस्तू पुरवठ्यासंबंधीची निविदाच रद्द
Next post शरद पवारांवरील निलेश राणेच्या टीकेला रोहित पवारांचे चोख उत्तर म्हणाले……

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News