मजूर घेऊन जाणाऱ्या एस टी बसला अपघात, चार मजूर जागीच ठार

यवतमाळ ब्रेकिंग

-8 जण गंभीर, तर 24मजूर जखमी

यवतमाळ, ता. १९ : उत्तरप्रदेश व झारखंड येथील मजूराना सोलापूरवरून घेऊन जात असलेल्या एस. टी. बसने मंगळवारी (ता. १९) भल्या पहाटे साडेतीनदरम्यान आर्णी-माहूर रोडवरील कोळवन येथे टिप्परला जोरदार धडक दिली. या भीषण अपघात चार मजूर जागीच ठार झाले असून 24 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे.
आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात सर्व जखमी मजुरांवर उपचार सुरू आहेत. यात 8 जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना यवतमाळ येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे. यात उत्तरप्रदेश व झारखंड येथील मजुरांचा समावेश आहे. त्यांना नागपूर रेल्वेस्थानकावर बसने पोहोचविले जात होते.

Previous post वाघाच्या हल्ल्यात महिला ठार
Next post वङिलाने मुलाला, तर मुलाने बापाला ठार मारले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News