केंद्र शासनाच्या पॅकेजमधील फोलपणा लपविण्यासाठी भाजप अंगणात : खासदार बाळू धानोरकर

चंद्रपूर : कोरोना विषाणूचे संकट रोखण्यात राज्य सरकारला अपयश आल्याचं सांगत भाजपने आज आंदोलन केलं. मात्र राज्य सरकार काम करत असून महाराष्ट्रात सर्वाधिक टेस्टिंग सुरु आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमधील फोलपणा देवेंद्र फडणवीस यांना दिसला म्हणून आता ते राज्य सरकारकडे पॅकेजची मागणी करीत असून अशा प्रकारचे गल्लीच्छ राजकारण ते करीत असल्याचा आरोप खासदार बाळू धानोरकर यांनी केला आहे. कोरोनाविरूद्ध महाराष्ट्र सरकार प्राणपणाने लढत असतानादेखील राज्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे. भाजपचे हे गलिच्छ राजकारण जनता कधीही मान्य करणार नाही. उलट ती या चुकीच्या राजकारणाचा निषेध करेल, आणि भाजपला धडा शिकवेल अशी टीका खासदार बाळू धानोरकर यांनी केली.
कोरोनाच्या संकटात ज्यांनी मतदार संघाकडे डुंकूनही पाहिलं नाही. जे सरकार अस्थिर करण्यासाठी वारंवार राज्यपालांकडे चकरा मारत होते. आज तेच फडणवीस महाराष्ट्र वाचवण्याच्या गोष्टी करतायत. हे म्हणजे असं झालं..
स्वतःच घर सांभाळेना अन् हे निघाले गावाचा कारभार करायला असा टोला त्यांनी लावला. मागील पाच वर्षात उद्योग व्यवसाय गुजरातला गेले. बुलेट ट्रेन प्रकल्प आणून राज्याचे महत्व कमी करायच आणि त्या बुलेट टेनचा खर्च सुद्धा जास्त राज्य सरकार करणार ह्या निर्णयामुळे फडणवीसांनी राज्याशी गद्दारी केली. त्यांनी मागील पाच वर्षात ना शिवस्मारक बांधलं, ना आंबेडकर स्मारक बांधलं, ना ७२ हजाराची मेगाभरती केली, ना पारदर्शक शेतकरी कर्जमाफी दिली. सतराशे साठ भानगडी करून बसलेले आज महाराष्ट्र वाचवायला निघालेत! असल्याची टीका खासदार बाळू धानोरकर यांनी केली.

Previous post तलाठी;ग्रामसेवक यांनी मुख्यालयी रहावे
Next post विहीरीत उडी घेवून किरकोळ व्यावसायीकांची आत्महत्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Chief Editor

Shri. P. S. Ambatkar

Chief Editor - Daily Deshanayak News