

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या डिप्लोमा इन इंजिनीरिंग कॉलेज वडगाव येथे स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. संस्थेचे संस्थापक श्री. पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, डायरेक्टर सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य श्री.जमीर शेख सर, उपप्राचार्य,प्रा.अनिल खुजे ,रजिस्ट्रार श्री.बिसेन सर यांची उपस्थित होते.
स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय युवक दिन म्हणून घोषित करण्यात आले असून स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल विधार्थांना माहिती दिली, स्वामी विवेकानंद यांचे नाव नरेंद्रनाथ दत्त असे होते, त्यांचा जन्म १२ जानेवारी मध्ये कलकत्ता येथे झाला ते लहानपणापासून कुशाग्र बुद्धीचे होते, ते शाळेतील सर्वात हुशार विधार्थी होते.
रामायण,महाभारत,भगवतगीता,वेद आणि पुराणे यांचा त्यानी सखोल अभ्यास केला होता.रामकृष्ण परमहंस हे नरेंद्रनाथाचे गुरु होते,गुरूंनीच त्यांना विवेकानंद हे नाव दिले, त्यांनी भारतीय संस्कृती आणि हिंदुत्वाचा प्रसार जगभर करण्याचे कार्य केले,तसेच शिकागो येथील सर्वधर्म परिषदेत त्यांचा भाषणाचा सर्वावर प्रभाव पडला तेथूनच ते विश्वप्रसिद्ध झाले. ‘ उठा जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्हाला तुमचे ध्येय मिळत नाही ‘ हा संदेश स्वामींनी सर्व तरुणांना दिला.ज्यांनी फक्त भारतातल्या युवा पिढीसमोर आदर्श नाही तर संपूर्ण जगातल्या युवापिढीसमोर आदर्श ठेवला.
तसेच त्यांनी संपूर्ण भारतभर ज्ञानदानाचे व समाज प्रबोधनाचे कार्य पार पाडले त्यांचा जन्मदिवस ‘’राष्ट्रीय युवा दिन ‘’ म्हणून साजरा केला जातो.
या कार्यक्रमाला सर्व विभाग प्रमुख आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विधार्थी उपस्थित होते.
